की कविताच सुचेना झाल्या
वयानुसार पावसाळे कमी पाहिले
तितक्या पावसाच्या धारा झेलल्या
वाटा अनेक फुटून गेल्या
काही त्या धारात वाहून गेल्या
अनुभव बनले मास्तर माझे
जगण्याच्या दिशा तयार झाल्या
घरट्यापासून दूर माझ्या
माणूस बनवून गेल्या
दुनिया गोल आहे रे असं
जाता जाता सांगून गेल्या
दिशांमध्ये झाला गोंधळ कारण
सूर्योदय आता होत नाही
विचारात गुरफटते मन इतके
की कविता आता सुचत नाही
- वरद