Wednesday, 21 September 2016

कविता आता सुचत नाही....!!

विचार डोक्यात इतके झाले
की कविताच सुचेना झाल्या
वयानुसार पावसाळे कमी पाहिले
तितक्या पावसाच्या धारा झेलल्या

वाटा अनेक फुटून गेल्या
काही त्या धारात वाहून गेल्या
अनुभव बनले मास्तर माझे
जगण्याच्या दिशा तयार झाल्या

घरट्यापासून दूर माझ्या
माणूस बनवून गेल्या
दुनिया गोल आहे रे असं
जाता जाता सांगून गेल्या

दिशांमध्ये झाला गोंधळ कारण
सूर्योदय आता होत नाही
विचारात गुरफटते मन इतके
की कविता आता सुचत नाही


                          - वरद 

Saturday, 17 September 2016

स्वप्नातील ढग....!

कधी कधी स्वप्नातल्या
ह्या सुप्त ढगातुनी
क्षणिक सुखाच्या जीवनाची
दिसते झलक ताऱ्यांची

दिवसागणिक बदलत
जाणाऱ्या नात्यांची
समाजात होणाऱ्या
अक्षम्य गैरवतनांची

बदल आहे माणसाच्या
जीवनातील एक रत्न
त्यातील परिणामांच्या
पर्वेतून सर्वच मुक्त

असे जगणेच दुर्दैवी
पण मरणे मात्र पाप
पण मी विसरलोच
हे तर स्वप्नातील ढग

फक्त स्वप्नातच भेटणारे ....! 


                       -  वरद 

Friday, 12 August 2016

प्रवासी ...!!

आयुष्याच्या वाटेवर चालताना
भेटले होते अनेक प्रवासी
कुणी मांडलं होतं प्रेम
कुणाची तिरस्काराची रीत

अगणित नाती जोडली गेली
होती भावनांमधली प्रीत
तुटलेली नाती तेवढीच होती
दुखावलेल्या मनांचे गीत

रंग रूप भाषा स्वभाव
मेळ नसे सर्वांचा ठीक
समजले ज्यांना मन माझे
तेच राहिले जवळीक

हेच आपुलकीच नातं
लिहिल होत सागराच्या काठावर
डोळ्यांमध्ये आली होती भरती
जेव्हा वाहून गेलं होत सर्व

दिवसागणिक ही भरती
नुसत्या आठवणींनी वाढायची
डोक्यातील समुद्री वादळांनी
माझी होडी हेलकावे खायची


                   -   वरद

Wednesday, 3 August 2016

तुझ्याविना...!!

वाटलं होत तुला कधी
भेटणारच नाही
झाली होती चूक कधी
तुझ्याविना राहणारच नाही
केलं होत प्रेम कधी
तुझ्याविना होणारच नाही
बागडलो होतो कधी
तुझ्याविना हसणारच नाही
जगलो होतो कधी
तुझ्याविना मरणारच नाही
भरलं होत पोट कधी
तुझ्याविना अन्न नाही
मेलो होतो कधीच
तुझ्यासाठी भटकणार नाही

                -   वरद 

जादू या शब्दांची ...!!

जादू या शब्दांची
न उलगडणाऱ्या अर्थांची
होणाऱ्या प्रेमाची
वाटणाऱ्या तिरस्काराची
तुटणाऱ्या संसाराची
जोडणाऱ्या नात्यांची
क्षणिक सुखांची
नाजूक स्वरक्षणांची
आलेल्या अनुभवांची
सुंदर आठवणींची
लहान चुकांची
केलेल्या माफीची
ओळखलेल्या मनांची
बागडणाऱ्या फुलपाखराची
कोसळणाऱ्या धारांची
दाटलेल्या धुक्याची
जादू ही कवितेची
रहस्यमय शब्दांची
उलगडणाऱ्या भावनांची

                       -  वरद 

Tuesday, 2 August 2016

याद करता हु...!!

तेरी वो खिलखिलाती हँसी
अपने होंटो पे ले चलता हु
तेरी यादोंमे मैं तो
रोज नहाया करता हु

तेरी आँखों की नमी
अपने दिल में रखा करता हु
तेरी ख्वाबोमे अक्सर
मैं झुक जाया करता हु

तेरी हसीन यादोंको
मन में सजाया करता हु
जब भी तेरी याद आये
बस खुदा को याद करता हु

इतनी तेरी यादे
साथ लेकर जी लेता हु
अकेले ही कही
 टूट जाया करता हु

                       -   वरद


Monday, 1 August 2016

ती आणि कविता ...!!

तिला माझ्या कविता आवडतात
आणि मला कवितेतील ती
मी तिच्यात कविता शोधतो
ती कवितेत स्वतःला शोधते
तिला कवितेचा भाव समजतो
मला तिचा स्वभाव उमजतो
कळत नकळत शब्द जुळतात
धुंद मनांचे स्वर जुळतात
शब्दात ती गुंतून जाते
कवी मन माझे मोहरून जाते
तिच्या वाचण्याने कवितेच्या
स्वर मिळे शब्दांना
अर्थ मिळे कवितेस  तेव्हा
हसू येई गाली तिच्या जेव्हा


                          -   वरद  

Monday, 18 July 2016

तुला पाहता...!!!

तुला पाहता माझ्या
मनी होत असे काही
तुझ्या नयनांची अथांगता
त्या सागरास नाही

तुझ्या कांतीची लकाकता
त्या भास्करास नाही
हरिणीसारख्या त्या जिवणीची
मूर्तिमंत प्रतिमा पाही

काळ्या मखमली केसांची
मुलायमता त्या कापसास नाही
सुंदर करकमलातील बळ
चिखलातील कमळातही नाही

बाह्य सौन्दर्याने मोहून
परखणारा मी नाही
तुझ्या शुद्ध मनीचा सुगंध
मी माझ्या मनी पाही

तुला पाहता माझ्या
मनी होत असे काही
तुला पाहता माझ्या
मनी होत असे काही

                  -  वरद 

Tuesday, 12 July 2016

किती सांगायचंय मला....!!!

किती सांगायचंय मला
खुप बोलायचय मला
 तुझ्या पंखांखाली
स्वछंदी विहरायचंय मला

किती सांगायचंय मला
डोळ्यांत तुझ्या बघायचंय मला
तुझ्या हृदयी वीणेची
तार छेडायचीय  मला

 किती सांगायचंय मला
हातात हात तुझा घ्यायचाय मला
तुझ्या त्या स्पर्शाने
डोळ्यात पाणी काढायचंय मला

किती सांगायचंय मला
तुझ्या मनात डोकवायचंय मला
तुझ्या सोबतच्या क्षणांची
उजळणी करायचीय मला

किती सांगायचंय मला
किती सांगायचंय मला
सर्व काही बाजूला ठेवून
फक्त तुझं व्हायचंय मला

किती सांगायचंय मला
खूप सांगायचंय मला

                              -   वरद 

Tuesday, 10 May 2016

वेगळी ही मजा ....!!

काही कमावण्या पेक्षा
काही गमावण्याची ,
तर काही तुटण्याची
मजा वेगळीच असते

वाट्याला आलेल्या सुखा पेक्षा
जीवनातील दुःखाची
त्यातून होणाऱ्या वेदनांची
मजा वेगळीच असते

आपलं आपलं म्हणता म्हणता
दुरावत जाणाऱ्या नात्यांची
तुटणाऱ्या भावनांची
मजा वेगळीच असते

साफ रस्त्याने चालताना
अचानक घुसलेल्या काट्याने
 बसलेल्या धक्क्याची
मजा वेगळीच असते

बाहेर पाऊस पडत नसताना
डोळ्यातून पडलेल्या सरींची
त्यात भिजलेल्या हृदयाची
मजा वेगळीच असते

रात्रीच्या स्वप्नात विहारताना
आठवणीनच्या सागरात
बुडालेल्या क्षणांत डुंबण्याची
मजा वेगळीच असते

दुरावलेल्या अंतराची साथ
एकटेपणाला मिळते
त्याच्या सोबतच्या क्षणांची
मजा वेगळीच असते

जीवन जगण्या पेक्षा
घडलेल्या चुकांची
त्या अनुभवांची  चव चाखण्याची
मजा वेगळीच असते


                                 -  वरद 

Friday, 6 May 2016

तुटलेला मी एकटाच या दुनियेशी

मी कोणी शत्रू नाही
मी कोणाचा मित्र नाही
मी फक्त माझा आहे
कोणी घातलेली भिक नाही
कि भिकाऱ्याचा माझा जन्म नाही

खात्या पित्या घरचा
कुलादिपकाचा जन्म पाही
ना आहे भीती कुणाशी
ना आहे राग कुणाशी
तुटलेला मी एकटाच या दुनियेशी

दुनिया आहेच ही गोल
त्यात मी पुन्हा तळाशी
मोठी मोठी स्वप्न पाही
ना स्पर्धा कुणाशी
 तुटलेला मी एकटाच या दुनियेशी

संकटे येती मोठी मोठी
हिम्मत माझ्या पाठीशी
दोन हात एकेकाशी
तुटलेला मी एकटाच या दुनियेशी


                                  -  वरद 

Monday, 18 April 2016

यूही ज़िन्दगी में ....

कभी कभी जिंदगी में ये क्यों होता है
लोग अक्सर अपने वादोसे मुकर जाते है
साथ चलना नहीं है
पर नफ़रत करना सीखा  देते है

कभी कभी जिंदगी में ये क्यों होता है
दोस्त कहके पुकारते जिनको हम है
थोड़ी गलतियां क्या करदी
बिच रास्ते में ही साथ छोड़ देते है

कभी कभी जिंदगी में ये क्यों होता है
प्यार करने वालो में  नफरत पैदा होती है
घुट घुट के मरते है वो
जो सच्चे प्यार के दीवाने होते है

कभी कभी जिंदगी में ये क्यों होता है
इंसान सौ  गलतियां करता है
माफ़ नहीं होती उसकी वो एक गलती
जिसकी वो सौ  बार माफ़ी मांग चूका होता है

कभी कभी जिंदगी में ये क्यों होता है
लोगोंको मरने से नहीं प्यार से डर लगता है
सफल नहीं होता प्यार जिनका
कुछ मरते है कुछ मर मर के जी लेते है

कभी कभी जिंदगी में ये क्यों होता है
लोग पहचान ने में भी इंकार कर देते है
बातें करनी तोह दूर की बात
लोग तोह बिना शकल देखे ही चले जाते है

अक्सर जिंदगी में  यही होता है
दूरियां बढाती है सिर्फ यादें रहे जाती है
जाना था जिनको वो चले जाते है
हम तोह यु ही
गहरे पानी  के नीले समंदर में कही खो जाते है

                                           -  वरद

Saturday, 16 April 2016

जगण्यातील अर्थ

इथे जन्म घेतात माणसे
होतात काहींची रत्ने
न होती अमर सारे
मग जगण्याला अर्थ का रे

अर्थाचा कधी अनर्थ होतो
गैरसमजातून स्वार्थ घडतो
उपकाराचा भाव जडतो
मग जगण्याला अर्थ का रे

मरणाला सर्व घाबरतात
वाईट जगणे मरण म्हणतात
भीतीपोटी हा मार्ग पत्करतात
मग जगण्याला अर्थ का रे

जगणे नाही माणूस बदलतो
माणूस  असून माणसाला विसरतो
पण तरीही जगतच असतो
मग जगण्याला अर्थ का रे

कोणत्याही जगण्याला अर्थ नसतो
तो अर्थ आणावा लागतो
तेच जगण सार्थ  असत  ......
नात्यामधील अस्तित्वाने
फरक पडत नहीं ज्याला
त्याच जगण  मात्र निरर्थक असत.......... 

                                             -    वरद

Thursday, 14 April 2016

आयुष्य आपलं.....!!

खरच...किती बरं झाल असत,
जर...आयुष्य आपल वाटता आल असत....आपल्यातल आयुष्य थोड,
दुसरय्रा कुणाला देता आल असत.....

आईने आपलं आयुष्यच
मुलाला दिललं असतं....
खरच...किती बरं झाल असत,
जर...आयुष्य आपल वाटता आलं असत

एक प्राणी दुसय्राला खातो
त्याच आयुष्यच दुसय्राला देतो....
आपल्या माणसांसाठी कष्ट घेऊन
आपण आपलं आयुष्य त्यांना देतो....

पण...किती बरं झाल असत,
जर...आयुष्य आपल वाटता आलं असत....

एखाद्याची यातना स्वतः
अनुभवली असती....
तर काही दिवस आपली
रोजच दिवाळी असती....

तेव्हा कुठे सगळ्यांना
इतरांची जाणीव झाली असती....
आपल्यांचे कष्ट तरी कमी करावे
अशी बुद्धी त्यांना झाली असती....

तेव्हा कुठे आपली माणसं
सुखी झाली असती....
आपलं आयुष्य आपल्यांसाठी दिलं
म्हणुन समाधानी झाली असती....

म्हणुनच मग...
आपल्यांसाठी आपलं आयुष्य
वाटून बघा.....
मला होतो तसा.....!!
आयुष्य वाटण्यातला आनंद
चाखून बघा.....

                    - वरद

शब्दांनी असं का केलं ?

खुप काही बोलायचं होतं
पण शब्दच सुचले नाहीत
शब्द ओठात लपले
त्याना पायच फुटले नाहीत

फक्त डोळ्यातूनच बोललो
शब्द आतच राहीले
मग विचार माझे गेले
त्यांनाच शोधत राहीले

शब्द होते फिरत
वाटली नाही त्याना
बाहेर येण्याची गरज
ते तर होते मस्त फिरत

शब्दांच्या या दुनीयेत
मन माझे गेले
सगळ्या शब्दांच्या
पाया  पडले

तेव्हा शब्द ओठांवरती आले
छान छान बोलु लागले
पण मला प्रश्न पडला की
शब्दांनी असं का केलं?
शब्दांनी असं का केलं?
 
               -  वरद

''मलाच कळत नाही''

मी कोण आहे
मलाच कळत नाही.....

मला काही बोलायचं आहे
मलाच कळत नाही.....

मला काही सांगायचं आहे
मलाच कळत नाही.....

मला काहीतरी बनायचं आहे
मलाच कळत नाही.....

मला काहीतरी विचारायचं आहे
मलाच कळत नाही....

मला जगायचं आहे
मलाच कळत नाही.....

मला खुप काही करायचं
मलाच कळत नाही.....

हे सगळं कळतं मला
पण...
बोलायला शब्दच सुचत नाही....
हे असं का होतं
मलाच कळत नाही.....

अशा या वेड्या मनाला वाटतं
त्याला काही कळतच नाही.....
                  
                       -  वरद

कुणासाठी कसं जगायच... ?

जीवन असच जगायच असतं...
रडता रडता हसायच असतं...

दुःखं तर येतच असतात
आपण फक्त हसायचं असतं...
हसता हसता जगायच असतं
रडता रडता हसायचं असतं...

हसत हसत संकटाला सामोरं जायच असत
काट्यातून गुलाब फुलवायच असतं...
प्रश्न असतो एकच,
कुणी कुणासाठी जगायच असतं ?...

आईने मुलासाठी तर गाईने वासरासाठी
जगायच असतं...
तुमच्या आमच्या नात्यासाठी
जगायच असतं...

कमळासारखं चिखलातही आवडावं
असं जगायच असतं...
स्वतःचं मन सुंदर करताना
स्वतःसाठी जगायच असतं...

मनातील वादळांशी झगडत
जगायच असतं...
मोहाचे काटे विसरुन आपल्या
स्वप्नापर्यंत जायचं असतं...

स्वतःचं मन सुंदर करताना
दुसय्राचही मन जिंकायचं असतं...
माणसाने माणसासाठीच
जगायच असतं...

जगता जगता दुसय्राच्या ह्रदयात आपलं
स्थान निर्माण करायचं असतं...
आपल्या आणि फक्त आपल्या
माणसांसाठीच जगायचं असतं...

जीवन असच जगायच असतं...
रडता रडता हसायच असतं...
हसता हसता जगायच असतं...
        
                                - वरद

आपली मैत्री

मैत्री आपली अशी लोणच्यासारखी
मुरत जाते जुनी होइल तशी

मैत्री आपली अशी फोडणीसारखी
लज्जत येते जीवनाला कशी

मैत्री आपली अशी मीठासारखी
चव नसेल तर जीवन अळणी

आहा तुम्ही सावरायला
म्हणून पडायला आवडते

आहात तुम्ही हसवायला
म्हणून रडायला आवडते

आहात तुम्ही समजवायला
म्हणून चूकायला आवडते

आहात तुम्ही आयुष्यात
म्हणून जगायला आवडते

                    -वरद

मैत्री ही अशी ....

सोबत नसताना पण
होतो भास
आठवतात शब्द
आहेच मी पास

वाटते मैत्रीण
माझी असावी
नेहमी माझ्या
जवळ असावी

येतो स्वार्थी विचार
मनात माझ्या

अशी मैत्रीण फक्त
माझीच असावी
अशी मैत्रीण तर
कोणालाही न मिळावी
वाटतय तिला सगळ्यां पासून
लपवून ठेवावी

हे वेडं मन सारखा
असाच विचार करतं
म्हणुन बय्राच वेळा
नाराज ही होता

कारण
त्याला माहीती असतं

हा स्वार्थी विचार फक्त
विचारच राहणार
वेडं मन मात्र त्यासाठी
नेहेमीच झुलत राहणार

                      -वरद

कधी कधी....!!!

कधी कधी वेडे मन का हरवते ,
कधी कधी एकटे एकटे झुरते ;
कधी कधी वाट हळवी चालताना,
का अशी पून्हा संपते ...कधी कधी ...

कधी कधी भावनेच्या सागरात बुडते,
कधी कधी शब्दाच्या लहरीत तरंगते ;
कधी कधी काव्यातील अबोल भाव,
न बोलता सारे जाणून घेते... कधी कधी...

कधी कधी रेशमी स्वप्न फुलते,
कधी कधी आठवणीत रमते ;
कधी कधी नकळत का पून्हा असे,
आपल्या माणसांना बिलगते... कधी कधी...

कधी कधी मन एकातात झूरते,
कधी कधी सावलीस बिलगते ;
कधी कधी स्वपनाळू सारखे का असे,
पून्हा  स्वपनातच रमते....कधी कधी...!!

                                 -वरद

तुमच्यामुळे....

तुझ्या  हळूच हसण्यात साऱ्या
प्रश्नांची उत्तरे माझ्या
जरी झाले ओठ मुके तरी
डोळ्यात आठवणी ताज्या

बहाणे सारे तुझे
अलगद छळणारे
माझ्या या वेड्या
मनाला भूलवणारे

ताकत आहे शब्दात
एवढी तूझ्या
मग हरवतात कसे हे शब्द
बोलताना माझ्या

नजरेतील भाव तुझ्या
मलाच माझ विसरणारे
भूल पडे नजरेला माझ्या 
नकळत त्यात मला गुंतविणारे!

                       -वरद

आज मला खूप एकट वाटतय.

आज मला खूप एकट वाटतय.,

कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय..,

कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय..,

मनात चाललेल सगळ सांगावस वाटतय...

आज मला खूप खूप रडावस वाटतय....,

स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय...,

भरलेल्या डोळ्याने,आरश्या समोर बसावस वाटतय...,

मला गाणं गावस वाटतय...,

गाण्यातच मिसळून जावस वाटतय....,

अन् आपलं कोणीच नाही म्हणून...

स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...,

आज मला परत भूत-काळात जावस वाटतय....

परत एकदा आठवणींत जगावस वाटतय..,

आज मला खूप एकट वाटतय.,

आज मला खूप एकट वाटतय.,

                        - वरद

स्वप्न...!!!

स्वप्न हे सजताना
रात्र ही सरते....
गोड अशा झोपेत
साखर ही तरळते....

मनातील भाव
उमटतात स्वप्नात....
पाहतो आपण तेच
विचारांच्या गुंत्यात....

मिटलेल्या डोळ्यांनी
चित्र तुझे सजते....
तिथे जाण्यास मग
मन वेडे झुलते.....

स्वप्नांना येतो
गोडपणा साखरेचा....
दरवळतो सुगंध
त्या रातराणीचा....

ऊनातही होते
थंडीची बरसात.....
भिजते मनही वेडे
त्या थंड तुषारांत....

वाटते भिती ज्यांची
चार हात त्यांच्याशी....
नसे होत हिम्मत तर
झोपेतही तू रडशी.....

स्वप्नात सगळ
चालून जातं....
कळत नकळत सगळ
घडून जातं....

स्वप्नात जमते या
शब्दांची मैफील....
धुंद या आठवणीत
जगापासून गाफील.....

स्वप्नातल्या या सावल्यांचा
होतो खेळ जास्त थोडा....
पण.....
तिथेही नाही मिळाली साखर
होतो निराश हा वेडा....!!!

                 - वरद

तू .....

माझ्या शब्दांची ....
जोड तू  .....
कोवळे माझे ....
मन तू ....
आनंदाचे ..हे....
क्षण तू ..
शब्दांशी माझी .....
तडजोड तू ......
माझ्या जीवनाचा .....
मुड तू ....
विरहाचा तो .....
साथी तू .....
इतक्या विचारांचा ....
एक शब्द तू.....
माझ्या शब्दांची....
धार तू.....
जवळ असण्याचा .....
भास तू.....
मोठ्या आकाशातले ......
मुक्त पाखरू तू....
खुल्या चांदण्यातलं.....
सुख तू....
माझ्या दुःखातला.....
सहारा तू.....
माझ्या दिव्यातील.....
वात तू.....
माझ्या स्वपनातील....
शब्दांचं गाव तू.....
त्यात विचारांची.....
घरं तू....
माझ्या जगण्यातील .....
अर्थ तू.....
तुझ्यातील माझे....
मीपण तू.....
रोजच माझ्या .....
जवळ तू....
माझ्या विचारांचा.....
मोकळेपणा तू....

                 -  वरद

तुच असतोस मित्रा..!

मित्र कोण असतो ?
मित्र कसा असतो ?
प्रत्येक क्षणाला मदत करणारा,
प्रत्येक पावलाला साथ देणारा,
तुच खरा मित्र असतो...!

तेच नाते बनते प्रेमाचे,
तेच नाते बनते विश्वासाचे,
हसणं-रडणं असतं त्यात,
तुच आपुलकीचा दिलासा देतो,
तुच खरा मित्र असतो....!

हे नाते बनते आपोआप,
त्याला न लागे कुणाचा आधार,
आपल्या मनामध्ये सतत ठसतो,
तुच खरा मित्र असतो....!

पाहिलेलं कधी खरं नसतं,
खरंदेखील कधी खोटं असतं,
रोज हसत जा माझ्यासाठी,
तुझविना मैत्री नाही कुणाशी,
याची जाणीव करून देतो,
तुच खरा मित्र असतो..!

काहीच नाही माझ्याशी लपून ठेवी,
सत्य काय आहे ? मला सांगतो,
मनातील सगळ्या भावना व्यक्त करतो,
तुच खरा मित्र असतो....!

                          -वरद

मैत्री म्हणजे......!!!

मैत्री म्हणजे असतो आधार...
एकमेकांचा अतुट विश्वास...
मैत्री म्हणजे कौतुकाची थाप...
हसता खेळता सहवास...
मैत्री म्हणजे सुर्योदय...
जीवनातील आस...
मैत्री म्हणजे सुरेख गंध...
दरवळणारा स्वच्छ सुवास...
मैत्री म्हणजे भांडण...
दुराव्याचा आभास...
मैत्री म्हणजे आपलेपण...
गप्पांचा तास...
मैत्री म्हणजे प्रोत्साहन...
पुढे जाण्याची कास...
मैत्री म्हणजे जीवन...
नात्यातला श्वास...
मैत्री म्हणजे मैत्री...
तुमची नि आमची खास.......!!!
          
                        - वरद

ती माझी मैत्रीण असते

जी नेहमी हसत असते,
जी कधी कधी चिडते;
 आणि लगेच शांत होते,
सर्वांना तिची मैत्री हवी-हवीशी वाटते,
.......ती...ती माझी मैत्रीण असते....!

तिना..! हसतांना खूप सुंदर दिसते,
रडतांना मात्र लहान मुलगीच असते,
पण ती हसली कि माझ्या आनंदाला सीमा नसते,
असं आमचं दोघांच “विश्वासाच” नात
......ती...ती माझी मैत्रीण असते .........!

सर्वांचा विचार करणारी,
स्वत:च दु:ख लपवणारी,
मनाच्या गाभाऱ्यात एकटीच दु:ख सोसणारी,
इतरांच्या आनंदात आनंद मानणारी
.....अशी.....ती...ती माझी मैत्रीण असते ........!

तिला ना....!  जास्त काही हव नसत,
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधते,
आणि सर्वांना आनंदी करते
..........ती....ती माझी मैत्रीण असते .......!

कधी-कधी खोट-खोट हसते,
पण तिथेच ती फसते,
कारण तिच्या Smile सारखी Smile 
या जगात कुणाकडेच नाही
...ती...ती माझी मैत्रीण असते .........! 

तिचे तीन भावंड तिच्या सोबतच असतात,
“जाऊद्या, सोडा, असचं” हि त्यांची नावं
.....मला ते फसवतात....., 
पण त्यात ती स्वतःच फसते
...कारण...ती ..ती माझी मैत्रीण असते ...!

तिला माऊ हवी म्हणून
ती नेहेमीच हट्ट करते
कुठेही माऊ दिसली की
ही तिला जवळ करते
माऊला बघून तिची कळी
नेहेमीच खूल्लेली असते...ती..ती माझी मैत्रीण असते .....!

तीना मनातून खूप हळवी असते
पण वेळ प्रसंगी कठोरही बनते
अत्यंत कठीण परिस्थितीत
सहनशिलता हिची परिक्षा घेते
पण त्यातूनही मार्ग काढते
.......ती..ती माझी मैत्रीण असते .....!

सगळ सगळ मला सांगते
माझी खूप सारी काळजी करते
ती स्वतः हसताना मलाही हसवते
असं फक्त एकच व्यक्ती करते
ती ....ती माझी मैत्रीण असते ......!
                           -वरद

तुच मित्रा

कविता कशी होते
मनाला कळत नाही
मैत्री कशी होते
कोणालाच माहीत नाही

केव्हातरी कुठेतरी
मन होतं हळूवार
मित्राकडे उघडतं मग
आपल्या भावनांचं दार

आपलं नातं असच आहे
भावनांच्या पलिकडे फार
एकमेकाचे विचार आपण
वाटून घेतोना यार

अशीच आपली मैत्री
जिवापाड जपावी
तुझ्या माझ्या यारीने
ती फूलतच रहावी
      
               -वरद

बाबा

छान होते बालपण
बाबा,तुमच्या कुशीतलं
मऊ मऊ भात आणि
परीच्या गोष्टीतलं

खोडकरपणा केल्यावर
ओरडायचात तुम्ही
रुसून मग झोपल्यावर
कुशीत घ्यायचात तुम्ही

दिवसभर काम करुन
बाबा,थकून जायचात तुम्ही
थकलेल्या हातांनी मग
झुला द्यायचात तुम्ही

माझ्यासाठी बाबा
लहानगे व्हायचात तुम्ही
उगाच रुसायचात अन्
उगाच भांडायचात तुम्ही

माझ्यासाठी बाबा
मित्र बनता माझे तुम्ही
कष्टकय्रा हातांनी तुमच्या
इच्छा पुर्ण करता माझ्या तुम्ही

होतो थोडा गर्व मनात
असे बाबा कोणाचेच नसो
मागणे हेच देवाकडे
जन्मोंजन्म तुमच्याच कुशीतला असो

                               -  वरद

नात्यासाठी....

दुनियादारीही करून बघीतली
स्वतःशी दुश्मनी करून झाली
खुप चूकाही करून झाल्या
पण पण नाती तर होतीच
ती स्वभावानूसार टिकवण जरा अवघडच
कधी कुणाला काहीतरी बोलाव
चुकीच आहे समजून नंतर माफी मागावी
पण त्याने कधीच माफ न कराव
पण जेव्हा जगण्याची आशाच संपते
तिथेच संपते की काय अस वाटत
अवस्था नटसम्राटासारखी झाली आहे
त्याला स्वतःच्या मुलांनी पण समजुन घेतल नाही
कुणी घर देता का घर ?
त्याच धरतीवर उभा आहे मी
पण घरासाठी नाही माफीसाठी....नात्यासाठी
नात्यांच्या या गुंत्यात मन वेडे झुरते
कधीकाळी दिवसभरूनी दिवसाकाठी मरते
क्वचित कधी किरणाची खोटी आस दाखवते
घडलेल्या चुकीच्या माफीसाठी थकून भागुन झिजते

                               -  वरद

कुणासाठी...कशासाठी....??

                                                       
कुणाच्याही इतक जवळ जाऊ नये की
आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्रदय कधी
तर असह्य यातना व्हावी

कुणालाही इतका वेळ देऊ नये की
आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
अन् एक दिवस आरशासमोर
आपणास आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीपण ओढ नसावी
की पदोपदी त्याची वाट बघावी
अन् त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

पण तरीही मन म्हणते नाती अशी जपावी की
त्यात मनाची मनाशी जोड असावी
निभवावे असे की त्याला 
कशाचीच तोड नसावी

थोड थांबून तरी बघाव
त्या नात्यातल्या गोडव्यासाठी
थोड मागे वळुन तरी बघावं
राहीलेल्या पाऊल खुणांसाठी
                              - वरद