तो प्रकाश म्हणे मजला
थांबू मी कशाला
गेला हरवूनी ह्या नभात
भोत हा कुणी गगनात सोडला
अंधारल्या रात्री साऱ्या
काळोख चराचरात भरलेला
हरवला तो स्वर्ग आज
मी माझ्यात जपलेला
बेफाम वादळ हे मनी
हृदयात किती हा धुरळा
शत नभी सजलेला तो
चंद्र आज कुठे कोसळला
सुखाच्या या सांजवेळी
भान सारे हरपलेले
क्षणाक्षणात भरलेला
मग हा अाक्रोश असे कुठला
- वरद
No comments:
Post a Comment